तुम्ही तर विनोदच केलात चक्रपाणी.
बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात.
मी कुठे नाही म्हणतो आहे. पण,
मी प्रत्येक समुद्रातील परीला देण्यासाठी ७ फुले घेऊन निघालो आहे.
या विधानात असे काय विशेष आहे बुवा? नावीन्य तर नाहीच आहे. पण हे विधान बालगीतातील असल्याप्रमाणे वाटते.
बाकी ४००० कवी वगैरे सांख्यिकी पुलस्ती म्हणतात तशी निरर्थक आणि अनाकलनीय.
हे आपले म्हणणे आपणच खोडून काढले आहेत. हे पाहा लगेचचे दुसरे वाक्य...
या ४००० कवींमध्ये आपला नंबर कितवा हे प्रत्येकाने आपापले तपासून पाहणे इष्ट!
म्हणजे ४००० ची संख्या निरर्थक नाही तर! अर्थात तुम्ही पुण्यात राहत नसाल तर प्रश्नच वेगळा.
मुळात, सात फुलांचा जसा आपण वेगळा अर्थ लावून त्याला सजविणार त्याच प्रमाणे ४००० या आकड्याचाही विचार व्हावा ही विनंती.
गझलेच्या बाराखडीत फक्त तंत्रासंबंधी चर्चा केली आहे. (कारण, तंत्राला बरेचजण पक्के नसतात. )
टीप : प्रदीपजींबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण, उपरोक्त गझल प्रदीपजींच्या नावावर नसती तर किती लोकांना ती पटली असती याचा ज्याने-त्याने विचार करावा.