काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक अपसंख्यांकांना कायम झुकते माप दिले. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
सहमत.

काँग्रेस्ने भरपूर भ्रष्टाचार केला, गुंड पोसले, सर्व खरे आहे. आणि म्हणूनच लोकांना चांगला पर्याय हवा होता. त्या दृष्टीने सर्व भाजपा कडे आशेने पाहत होते.
सहमत.

पण भाजपाने आमची घोर निराशा केली. खरे धर्मनिरपेक्ष राज्य आणण्याऐवजी राममंदिराचा अत्यंत अव्यवहार्य मुद्दा पुढे आणला. बाबरी मशीद पाडायला प्रोत्साहन दिले आणि  अतिरेक्यांचे संकट, जे फक्त काश्मीर भागापुरते मर्यादित होते, ते सगळ्या देशावर ओढवून घेतले.
हे कसेकाय? बाबरी पाडली नसती तर काय दहशदवाद्यांचे संकट काश्मीर पुरते मर्यादित राहिले असते? पाकिस्तान च्या निर्मितीची मागणी झाली तेव्हा कोणती मशीद पाडली होती? काश्मीर मध्ये अतिरेकी कारवाया सुरू झाला तेव्हा कोणता दर्गा पाडलेला होता? या दहशादवादाचे बाबरीचे पतन हे समर्थन निदान अतिरेकी नसलेल्यांनी तरी करू नये. दहशदवाद पसरतच होता. ती वेळ जुळून आल्याने बाबरीशी त्याचा संबंध जोडण्यात आला.

त्याशिवाय अत्यंत ढोंगी राजकारण केले, भ्रष्टाचारात आपण काँग्रेसच्या जराही मागे नाही हे दाखवून दिले. त्यामुळे शेवटी लोकांना काही पर्यायच उरला नाही. नाईलाजाने लोक पुन्हा काँग्रेसकडे वळले. हेच खरे दारुण सत्य आहे. 
एक नंबरी सत्य.