हा विषय गहन आहे. सुदैवाने काही लोकांनी विनोदी पध्दतीने जीवनाचे सार सांगीतले आहे.

हिरामण यांनी प्रवासामुळे हा विचार मनात आला आहे असे लिहले आहे, इतक्या कमी काळावधीत असे काही निष्कर्ष काढले पाहिजे काय हा एक प्रश्न आहे.
माझ्या मते लग्न हे पोहोचायचे (गंतव्य) स्थान नसुन जीवनाचा प्रवासातील टप्पा आहे असे मानले पाहिजे.
सुख-दुख हे बाहेर नसुन मनाचेच खेळ आहे असे जाणले पाहिजे. दुर्दैवाने शेकडा ९९.९९% संसारात दुखीः असतात ही वस्तुस्थिती आहे हे मान्य केले पाहिजे.
प्रितीविवाह किंवा ठरवलेले विवाह याचा सुवर्णमध्य म्हणुन मामाच्या मुलीशी लग्न हा पर्याय मला योग्य वाटतो.
या विषयावर लग्न झालेल्यानी लिहणे हे जास्त संयुक्तिक राहील असे मला वाटते. ( माझा अनुभव, अपेक्षाभंग, नेमके काय चुकते वगैरे मी नक्कीच लिहेन.) जेणेकरुन तरुण मुला-मुलींना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. 

या विषयावर एकतर तसा दृष्टिकोन पाहिजे किंवा सखोल चिंतनाची सवय पाहिजे असे मला वाटते.

या चर्चेतुन बरेच काही निष्पन्न होइल असे मला वाटते.

द्वारकानाथ