mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून उड्डाण घेण्यासंबंधी मिळालेल्या सूचनांबाबत गफलत झाल्याने आज सकाळी दोन विमानांची समोरासमोर धडक लागून होणारा मोठा अपघात केवळ पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला. अगदी शेवटच्या क्षणी पायलटने ब्रेक दाबल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर दोन्ही विमानांत असलेल्या दोनशेहून अधिक प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन मार्फत आज काढण्यात आले आहेत.