जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळ्यात दरवर्षी किंवा मान्सूनपूर्व पावसात महाराष्ट्राच्या अनेक भागात दरवर्षी विजा कोसळतात आणि त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. मुंबई मात्र विजा कोसळण्याच्या घटना दुर्मिळ! पण आता मुंबईकरांनाही बेसावध राहून चालणार नाही, कारण वातावरणातील बदलांमुळे मुंबईतही विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.