श्री. प्रभाकर,

माझ्या वाक्यांचा सरसकट अर्थ काढुन, मला मिळत असलेले सल्ले व टोमणे आता काही मला नवीन राहीले नाहीत. असे मी आधी म्हाणालो होतो, हयाला सजेसे असेच आपले वरील लिखाण आहे.

भाग - १ सध्या सापडत नाही. तरी पण आपला वरील प्रतिसाद संदिग्ध आहे. कुठलाही मुद्दा पटल्याची स्पष्टोक्ती नाही.

संदर्भ न वाचताच , चर्चा संपण्याआधीच, आपण मी "मान्य करावे" ही अपेक्षा बाळगून आहात. आणि मी ते "कसे मान्य करावे" हे ही आपणच ठरवता आहत. एखादी गोष्ट मान्यकरण्यात मला कमीपणा / संकोच वाटत नाही, हे आपल्या लक्षात आणून द्यावे म्हाणून स-उदाहरण दिलेल्या लेखात आपण "मान्य आहे" हा शब्द शोधत बसलात, आणि जेथे तो सापडला तिथे.. मी ते का मान्यकेले आहे हे आपणच ठरवून टाकले !! आणि ईतर ठिकाणी मी मान्यकेले नाही असे भासवून मोकळे झालात.

माफ़ करावे, क्षमा असावी, लहान तोंडी मोठा घास घेतो, असली वाक्य मी वापरत नाही, ह्याचे कारण, मला ती फ़ारच formal वाटतातं. ह्याचा अर्थ माझ्यात नम्रता नाही अथवा एखादी गोष्ट मान्य करायला मला कमीपणा वाटतो हा आपण काढलेला अर्थ आहे. आणि तो चुकीचा आहे.

तुम्हाला राजकारण येत नाही म्हणता पण बोलता मात्र राजकारण्यांसारखेच. तुम्ही काय केले? हे विचारल्यावर, इतरांनी काय केले/करावे हे सांगून मोकळे झालात. इतरांकडे बोट दाखवून आपल्या चूका झाकण्याचा प्रयत्न करू नका. - पंकज. शुक्र, ०६/०५/२००५

ह्यावर आपलं उत्तर- यात चुक ते काय आहे? असे आहे.

खरं आहे, आपल्याला ह्यात काहीच चुक आढ्ळणार नाही. जेव्हा मी मुंबईतील भ्रष्ट मराठी माणसांवर टिका केली, तेव्हा आपण मला इतर राज्यात फ़िरुन यायला सांगितले, जेव्हा ब्रांम्हणांवर टिका केली, तेव्हा आपण इतर जातिंवर घसरलात. मध्ये एका कवितेत, हिन्दुंवर टिका झाली, तेव्हा त्या कवीला इतर धर्मांवर असचं लिहायचा सल्ला दिला. चर्चा भरकट्ल्यात.  ह्याला "नेहामी दुसऱ्यांकडे बोट दाखवीण्याचा" आपला स्वभावदोष, असेच नाईलाजाने म्हाणवे लागेल. जशी आपल्याला आपली मते आहेत ( ती तुम्ही कुठल्या आधारावर बनवीली आहेत, असे मी कधीच विचारले नाही) , तशीच ईतरांनाही आपापली मते असतात. सद्य विषयात,  ४-५ उत्तरात कोणाचे समाधान होईल व तुम्हाला हवे तसे आणि हवे त्या शब्द्दात तो ते मान्य करेल, अशी आपली अपेक्षा चुकीची आहे.  
 
व्यक्तिगत आरोपांची सुरुवात "काही विसंगती" ह्या सदरात, तुम्हिच केली होती. माझा लेख त्या सदरात ३ रा ( आणि माझा मनोगत मध्ये १ला लेख ) आहे आणि आपला (त्याला प्रतिसाद ) ४था. आपल्या त्याच लेखात, जीभ हासडत नाही का ? आपल्याला टाळीच्या वाक्याची सवय दिसते ! आपले सामाजिक कार्य काय ? आणि शेवटी, स्वतःच्या आईलाही इतके ... असली आपली वाक्ये होती. त्यासर्वांचेच आपण पुढे समर्थनसुद्धा केले. पुढे, लेखाचा "दर्जा" आपण ठरवून टाकला. आपली टीका लेखावर कमी आणि लेखकावर जास्त आहे असे जेव्हा मला, तिथे (काही विसंगती) आणि इथे (प्रतिभा जोशीं संदर्भात) जाणवले तेव्हा, त्याला तशीच उत्तरे / प्रतिक्रिया मी दिलीत, तर ती टिका मात्र वैयक्तिक झाली !! त्यावर आपल्यावर आपण "भ्रष्ट" असल्याची टिका मी केलेली नाहीये. उलट, आपल्या "अंतिम प्ततिसाद" ह्या लेखानंतर, आपल्या लेखाविरुद्ध ( आपण तिथे उत्तर देणार नाही, असे गृहित धरुन ) टिका/टीप्पणीही मी केलेली नाही.
 
ह्याच सदरात मला आपण दिलेली उत्तरे पटण्यासारखी नाहियेत.
 
आपला प्रश्न तळागाळातील लोकं आयुर्वेद जाणून घ्यायला उत्सुक होते
या चुकीच्या गृहीतकावर आधारीत आहे.  -पुन्हा, हेही आपणचं ठरवता आहात. तुम्ही तुमचीच मते मांडावीत, इतरांबद्दल, इतर बोलतील की !
 

पटवून ह्यायची इच्छा दिसत नाही. मुद्देसुद, संयमीत विवेचन करणे आणि शब्दाला शब्द वाढवून वाद घालीत बसणे यात फरक असतो.  

इतरांकडे बोटे दाखवून, समजविण्याची पद्धतच मला पटत नव्हती, उत्तरे कशीकाय पटतील ?? आपले "इतऱांकडे बोटे दाखवून" केलेलं संयमीत विवेचन सुद्धा पटण्यासारखे नव्हते. शब्दाल-शब्द म्हाणता, वाक्याला वाक्य कोणी वाठवलीत ?

ब्राह्मणांवर, इतर जातींच्या संदर्भात, जेंव्हा जेंव्हा आरोप होतील तेंव्हा तेंव्हा चर्चेच्या रणात इतरजातींनाही उतरावे लागणार. काठावर बसून मजा बघत बसता येणार नाही. मनोगतींव्यतिरीक्त इतर, अजूनही खूप खूप मान्य करतील.  

हा आपला भ्रम आहे. पहिली गोष्ट, इतरजातींनाही उतरावे लागणार, नव्हे,  तुम्हीच मध्ये ओढणार. दुसरी गोष्ट, आपले हे विचार मनोगतसारख्या (जिथे बरेचण आपले सम-विचारी आहेत) ठिकाणीच मान्य होतील.

चर्चेच्या रणात ...  / ब्राम्हणांनी गप्प बसु नये ( इतरांना आवाहन करता) , असली वाक्य मनोगतवर वापरता , आणि ज्या म.टा ने, ब्राम्हणांविरुद्ध लेख छापला, तिथे तोंड बंद ठेवता ! आपल्याला "तिथे" उत्तरे द्या हा सल्ला का नाही पटला, ह्याचे कारण आपल्यालाच माहीत !

आधी, दर्जा खराब ( हे आपणच ठरविले )म्हणून आपण चर्चा सोडलीत, आता, माझ्यावर मी असमजुतदार, काहीही मान्य करायला तयार नाही असे भासवून "वेळेचा अपव्यय" होतोय, असे म्हाणून चर्चा सोडायचे म्हणताय ! व्यक्तिगत आरोप करणे मलाही पटत नाही. परंतु, आपला वरील लेख वाचुन, अजुन काही पर्याय उरला नव्हता.

मयुरेश वैद्य.