जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते. तुकोबांच्या अभंगावरून महत्माजींना स्फुरली तीन माकडांची गोष्ट अशी शेखर जोशी यांची बातमी लोकसत्ताच्या (१७ जून २००९) च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे.