जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माणसांना शनिवारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने जरा दिलासा मिळाला. मुंबईत मात्र त्याने फक्त वातावरण निर्मिती केली. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि राज्याच्या अन्य भागात मात्र त्याने काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात आपली हजेरी लावली. दोन दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात सक्रिय होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरो आणि काल आलेला हा पाऊस राज्यात चांगला मुक्कामाला राहो, अशी आशा आहे.