जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मराठीमध्ये सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे.याचा साधा अर्थ असा की आपले आरोग्य चांगले असेल तर आपण बरेच काही करू शकतो. मनात खूप काही करायची ऊर्मी असेल पण त्याला शरीराने साथ दिली नाही, तर काही उपयोग नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीच उत्तम आरोग्य ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्य जपणे आणि ते टिकवणे हे आपल्याच हातात आहे. योग्य आहार-विहार आणि काळजी घेतली तर आजार आपल्याला होणारच नाहीत. इतके करुनही व काळजी घेऊनही समजा आपल्याला एखादा रोग/आजार झाला तर वेळीच व योग्य औषधोपचार मिळणेही तितकेच गरजेचे असते.