माननीय मंत्रीमहोदय यांनी जाहीर केलेला निर्णय योग्यच आहे पण त्याविषयी त्याना स्वतःलाच निश्चित कल्पना नाही असे दिसते कारण एकीकडे संपूर्ण भारतभर एकच बोर्ड
आणि एकच परीक्षा असे म्हणत दुसरीकडे बोर्डाची परीक्षाच वैकल्पिक करायची असे
म्हणायचे या दोन्हींचा कसा मेळ घालायचा ? आपल्या निर्णयाच्या सफलतेविषयी ते
आतापासूबच साशंक आहेत म्हणून राज्यांचा विरोध दूर करण्यात आपण सफल होऊ अशी
आशा ते व्यक्त करतात आणि त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयात मात्र आपण या निर्णयाची लगेचच
अंमलबजावणी करू असे म्हणून दुहीचे बीज रुजबत आहेत. आपले पालकही इतके आत्मकेंद्री
झाले आहेत की ते कोणताही निर्णय झाला तरी लगेच
कोर्टात जाण्याच्या तयारीत असतील त्यामुळे ही चर्चा केवळ आपला चर्चागंड शमवणे यापुरतीच
उपयोगी पडेल असे वाटते.