माझ्या मते 'तो पावसाळा' ही कविता आहे.   शब्दयोजनेतला गोडवा आणि नियमित यती, म्हणून कदाचित मला तसे वाटत असेल. बाकी कविता कशाला म्हणावे यावर अनेक प्रतिसाद येतीलच.

परंतु,  त्या कवितेत मला खटकलेला एक व्याकरणदोष आहे.  

आपण भिजायला बाहेर पडतो आहे    आपण  आहे?   ही कुठली रचना?   सामान्यतः कवितेत खालील बाबी दोष म्हणून समजल्या जातात. ऱ्हस्वदीर्घदोष, वचनदोष, लिंगदोष, अपसंधी, अनियमित संधी, विसंधी, अप्रयुक्त समास, निष्कारण अधिक शब्द, निरर्थक पादपूरणार्थी शब्द, क्लिष्टत्व, उलटा शब्दानुक्रम, अयोग्य वाक्प्रचार, यतिभंग, यमकदोष, छंदोदोष, प्रयोगशैथिल्य, अप्रयुक्त विभक्तिरूप, आणि.... अप्रयुक्त क्रियापदरूप.  ह्या कवितेत हा शेवटी निर्दिष्ट केलेला दोष आहे.