पूर्वीच्या काळातील लेखन हे काव्य या स्वरुपातच होत होते, हे रामायण , महाभारत यांना महाकाव्ये म्हणतात यावरून समजते. थोडक्यात आपला आशय पद्यातच माडायचा असाच प्रघात असावा. कालिदासाचाही उल्लेख महाकवी असाच होतो.  आपण बोलतो तसे लेखन नंतर होत गेल्यावर त्याचा गद्य असा उल्लेख होऊ लागला. त्यामुळे जे गद्य नाही ते काव्य अथवा कविता असे समजायला हरकत नाही.