राखी सावंतने स्वतःचे स्वयंवर मांडले आहे! मी याला बाजार म्हणतो....
काहीही म्हणा काहीही फरक पडत नाही..
राखी स्वतःला भारतीय नारी म्हणवते, मी याला दांभीकपणा म्हणतो....
तो कसा ते समजले नाही.
राखी स्वतःला " मै सच्ची हूं " म्हणते.......
असे विविध क्षेत्रातले लोक (विशेषतः राजकारणी मंडळी) म्हणत असतात सगळे तसे असतातच असं नाही.....मग राखी ने म्हटलं तर कुठं बिघडलं? (तिनं 'मैं सच्ची हूं' असं म्हणावं लागण्यासाठी खोटेपणा काय केलाय ते मला माहीत नाही.)
राखी सावंत ही येणाऱ्या सांस्कृतिक ऱ्हासाची नांदी आहे काय?
अजिबात नाही. कुठल्यातरी चॅनलने काहीतरी कार्यक्रम सुरू केला म्हणजे लोकांना ते मान्य आहे आणि लोक त्याचं अनुकरणच करतील असं समजण्याचं कारण नाही. लोकांना काय चांगलं काय वाईट ते चांगलंच कळतं. दुसरं म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे सांस्कृतिक ऱ्हास जर येणारच असेल तर त्याची नांदी आधीच झाली असली पाहिजे ना !
(मला राखी सावंतचे अजिबात कौतुक नाही.......!)
कावळा यांच्याशी सहमत. प्रसिद्धी शिवाय दुसरे काहीही नाही.