श्री. हर्षदजी,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आपली ही मते!


प्रतिभेच्या भरात शक्यतो एका सपाट्यात लिहून होते ती कविता. ती विचारपूर्वक जुळवून जुळवून करता येत नाही.

पु र्णपणे पटले. एका सपाट्यात होते याच एकमेव कारणामुळे मी हे मत कायम मांडत आलो आहे की गजलेत एक विशिष्ट समान मनस्थितीयायला हवी. आठ महिन्यात एक गजल केल्यावर तसे होऊ शकणार नाही.


दुसरा महत्त्वाचा प्रतिभा प्रकार म्हणजे कथा किंवा कादंबरी, यात 'प्लॉट' (मराठीत यास 'ढाचा' शब्द योग्य आहे काय?) ठरवताना अनेक बाजूंनी विचार करावा लागतो.

कथा व कादंबरीमध्ये प्रतिभा निश्चीतच असते व ते मी प्रस्तावातही म्हंटले आहे.



याउलट कविता विषय ठरवून करता येत नाही.


माझ्यामते विषय ठरवून कविता करता येते. मात्र, ती तशी केली जाऊ नये असेही माझे मत आहे.


किंबहुना माझ्या मते कवी कविता करतच नाही. ती वातावरणात निर्माण होते आणि योग्य काळ येताच कवीवाटे शब्दरूप पावते.


कवी कविता करतच नाही व कविता कवीच्या माध्यमातून बाहेर येते हे आपले मत आयडियल कवितेच्या बाबतीत खरे आहे असे वाटते. ते तसे असायला हवे हे मला मान्य आहे. परंतु ते कायम शक्य नसते. मग प्रश्न येतो की मग माणसाने नैसर्गीक कवितेशिवाय कविता करूच नयेतकाय? त्यावर मात्र माझे मत आहे की उलट सतत व मुद्दाम कविता कराव्यात व प्रकाशितही कराव्यात. कारण त्यातील काही ना काही कुणाला न कुणाला महत्त्वाचे वाटू शकेल. ( जी कविता आपली आपल्यालाच आवडत नाही ती मात्र करू नये. )

जरी नादमयता, यमक असे गुण कवितेस वापरता येतील, तरी ही कवितेची लक्षणे आहेत, व्याख्या नव्हे. आणि एखादे लक्षण न आढळल्यास संपूर्ण अस्तित्व नाकारणे मला योग्य वाटत नाही.

खादे लक्षण न आढळल्यास जरूर त्याला कविता म्हणावे. पण संपूर्ण गद्यच लिखाण असेल तर? किंवा मुक्तछंद म्हणजे पूर्णपणे 'मुक्त' असेल तर? मग आपल्या शाळेमध्ये मराठीत गद्य व पद्य असे दोन विभाग का असायचे? कविता ही नेसेसरीली 'पद्य' असायला नको का?