रुद्र शक्ति येथे हे वाचायला मिळाले:
परतीच्या वाटेवर दोघीं पैकी कोणीच काहीच बोलत नव्हत. जसलीनला कळत नव्हत की स्वत:च्या लग्नाची चिंता करावी की मेघना बद्दल जे ऐकल त्या बद्दल तिच्याशी बोलाव. मेघना सुन्नपणे गाडी चालवत होती. तिला खर खुप रडावस वाटत होत, ओरडावस वाटात होत पण तिच मन दगडासारख निश्चल पडलेल होत. जे घडल, जे ऐकल ते सगळ एक अघोरी स्वप्न आहे आणि यातुन कधी जागं होउ अस तिला वाटत होत. बाबाने सांगितलेल सगळ खोट आहे अस ती सारख घोकत होती. पण बाबाला खोट बोलुन काय मिळणार होत?