भूषणरावांची विधाने वाचून दया आली!

"...मुंबईबद्दल इतके विनोदी लिखाण वाचनात आलेले नाही.

...नंतर विचार केला की जीवनाने जी थट्टा केली आहे ती पुणेकरांची केलेली नसून मुंबईकरांची केलेली आहे. मुंबईकरांना असे उतरणे, चढणे हे अंगी बाणवावे लागते. ते न जमणारा परकीय विनोदी ठरतो. पण मजबुरी कुणाची असते?... मुंबईकरांची! "

मुंबईसमोर पुण्याचा दर्जा मोठा हे (केवळ स्वतःचा दुराभिमान म्हणून) ठरवताना - पुणेकर किती केविलवाणी विधाने करतात हे वाचून चांगलीच करमणूक झाली!

"..मराठी माणसांना मुंबई सांभाळता आली नाही म्हणून 'मुंबई देशाची' वगैरे संज्ञा चिकटल्या आहेत. ( देशाची आर्थिक राजधानी आहे हे माहीत आहे व अर्थातच मान्य असणारच! )... "

आता वादाचाच आधार घ्यायचा तर वरील बचावात्मक विधाने कशाला.......

.....आणि सगळ्यात महत्त्वाचे ........स्वातींनी एक चांगले दर्जेदार अनुभव कथन केले आहे त्यात हे प्रादेशिक मुद्दे आणणे गरजेचे आहे काय? की आपला ठोक स्वाभिमान दाखवण्याची हि आणखी एक केविलवाणी संधी साधली जात आहे?