आधीच सांगतो की स्वातीताईंना मी एक स्वतंत्र प्रतिसादही आत्ताच दिला ( आपला प्रतिसाद वाचण्यापुर्वी ) ज्यात मी त्यांच्या लेखनकौशल्याची मनापासून प्रशंसा केलेली आहे. कारण, भावनेच्या तीव्रतेमुळे मी नुसतेच मुंबई या विषयावर लिहिले हे माझ्या नंतर लक्षात आले.

आता आपल्या प्रतिसादाबद्दल : आपल्याला जर लेखनाबाबत आस्था आहे, प्रादेशिक वाद आणायचे नाही आहेत, तर आपण माझ्या प्रतिसादाबाबत कशाला एवढा मोठा प्रतिसाद दिला आहेत? आपल्याला तसे नैसर्गीकपणे वाटले म्हणूनच ना? तसेच मलाही नैसर्गीकपणे 'मुंबई' म्हंटले की तीव्र चीड येते, म्हणून मी तसा प्रतिसाद दिला.

बाकीः

१. ठोक स्वाभिमान दाखवण्याची 'केविलवाणी' संधी साधणे - हे माझ्यापेक्षा आपण केले आहेत असे मला वाटते. मी मुंबईबद्दलचा माझा राग प्रदर्शित केला. कारण प्रस्तूत लेखात लेखकाने मुंबईबद्दल आस्था प्रदर्शित केली आहे , त्यावर मी माझे मत मांडले. आपण मात्र त्याला प्रादेशिक वाद वगैरे संबोधून उगीचच नवीन रंग दिलात. मी पुणे श्रेष्ठ आहे हे कुठेही म्हंटलेले नसून पुण्याची माणसे बुद्दू आहेत हे ठरवताना स्वतःला काय आयुष्य जगावे लागते याचा मुंबईकर विचार करताना दिसत नाहीत असे विधान केले आहे.
२. मुंबईला सगळ्यात जास्त व्यापार चालतो हे जर मुळातच सत्य असेल तर त्याचा वापर मी करणे हा माझा बचाव कसा काय बुवा? मुंबईला देशातील सगळ्यात जास्त गटारे आहेत हेही खरे आहे. जे खरे आहे ते खरे आहे. बचाव बिचाव करण्याचा पळपुटेपणा करण्याची मला आवश्यकता नाही. 
३. मराठी माणसाला मुंबई सांभाळता आली नाही हे स्पष्ट आहेच. त्यासाठी मी किंवा कुणी बोलण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या राजधानीत बहुसंख्य लोक परराज्यातले आहेत इतकेच नाही तर ते जास्त गब्बर असून अनेक व्यवसायात पिढ्यानपिढ्या मुरलेले आहेत हे नवीन जन्माला आलेले बालक सोडून कुणीही सांगू शकेल.

तेव्हा, आपण उगीच आपली ताकद वाया घालवली आहेत, प्रतिसाद देण्यामधे!

धन्यवाद!