भूषणराव,

मला इथे कोणालाही दुखावण्यात स्वारस्य नाही, पण आपणच लिहिलंय त्यावरून मी माझी प्रतिक्रिया दिली. पाहा आपले आताच लिहिलेले...

"भावनेच्या तीव्रतेमुळे मी नुसतेच मुंबई या विषयावर लिहिले हे माझ्या नंतर लक्षात आले."

आपल्या ह्याच तीव्र भावनेबद्दल मी लिहिले , आपणाही हे मान्य केले आहेच!

आणखी एक आपलेच वाक्य पहा...

"मी मुंबईबद्दलचा माझा राग प्रदर्शित केला. कारण प्रस्तूत लेखात लेखकाने मुंबईबद्दल आस्था प्रदर्शित केली आहे, त्यावर मी माझे मत मांडले."

मीही आपल्या लिखाणावर माझे मत मांडले, त्यात चुकिचे ते काय? आपले मुंबईविरुद्ध मत मांडणे जितके साहजिक तितकेच समर्थनार्थ माझेही!

आणखी एक, आपला भारत देश किंवा आपला महाराष्ट्र, त्यातील बहुतेक साऱ्या प्रांतांत मी  राहिले आहे, अगदी लहानपणापासून. त्यामुळे कधीही हा भाग माझा आणि 'तो' तुझा या भावनेशी माझा संबंध आलाच नाही - फक्त 'आपला देश भारत' हाच विचार मला नेहेमी शिकवण्यात आला आणि अजूनही माझी तीच भावना आहे.

बाकी प्रश्न राहीला ताकदीचा...... काळजी करू नका, ई मेल टाईप करण्यासाठी जास्ती ताकदीची गरज नसते. 

आपले मुद्दे तेवढेच खरे आणि दुसऱ्यांचे विनाकारण मांडलेले हे आपले मत पटण्यासारखे नाही.

- मीसुचि.