कवितेची मध्यवर्ती कल्पना छान आहे. कविता ठीक. संपूर्ण कवितेत, बहुधा चुकून, ३-४ वेगवेगळी वृत्ते वापरलेली दिसतात.
१. राधिका जनास गा | राधिका जनास गा किंवा गालगालगाल गा | गालगालगाल गा
२. राधिका, राधिका, राधिका, राधिका किंवा गालगा, गालगा, गालगा, गालगा
आणि वरील दोन्ही वृत्तांचा संकर असे हे तिसरे वृत्त.
३. राधिका जनास गा| राधिका राधिका
चूभूद्याघ्या.
वृत्तात लिहिण्याचा छंदच जडला की अशा चुका होणार नाहीत असे वाटते. छंदात लिहीत राहणे, भरपूर लिहीत राहणे हाच उपाय असावा.