गझल आवडली.
आपला स्पष्टवक्तेपणाही आवडला.
यामुळे मला बरेच काही मिळाले. पुरस्कार, वर्तमानपत्रात नाव येणे, पैसे, आदर-सत्कार वगैरे गोष्टी! माझ्यासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण माझा मूळ उद्देशच प्रसिद्ध होणे हा आहे. (कवितेमार्फत - येनकेन प्रकारेण नव्हे! )
असे असेल तर उलट तुम्ही इतर 'स्वान्तसुखाय' कवींच्यापेक्षा जास्त विचारपूर्वक कविता केली पाहिजे. 'कवितेच्या माध्यमातून प्रसिद्ध होणे' हाच दृष्टिकोन असेल (ज्यात काहीही गैर नाही) तर आपली कविता अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी आपण आणखी बारकाईने वृत्ताचा, शब्दांच्या अचूक वापराचा, अर्थछटांमधील नाविन्याचा विचार करायला हवा, हा प्रेमळ सल्ला.
जितकी चांगली कविता कराल, तितके जास्त प्रसिद्ध व्हाल!
(प्रसिद्धीलोलुप)
शाहिस्तेखान.