हा विषय खरेच फार गहन आहे. पण गुरुंचे हे प्रस्थ आता तर फारच बोकाळलेले आहे. प्रत्येकाला गुरू असतोच असतो. आम्ही लहान असताना (साधारण २०-२२ वर्षांपूर्वी) देखिल इतके ऐकिवात नसायचे. आता आयटी मुळे आलेली सुबत्ता ( व ताणतणाव सुद्धा) यामुळॅ गुरुची अधिक आवश्यकता भासू लागली असावी.

पण मला तर खरे सांगायचे म्हणजे कधीच काही अत्युच्च,  सामान्य मानवाला अनाकलनीय , दैवी असे काही जाणवलेले नाही ( हे मी पाहिलेल्या काही गुरुंबद्दल आहे. ) पण लोक मात्र एकदम भारावलेले, भावपूर्ण असतात. माहिती नाही व्हॉट ड्राईवस देम... की फक्त एक मास मेंटॅलिटी.... एक गेला म्हणून मीही जाऊन पाहतो.. सत्याचा, प्रचीतीचा निकष लोक खरेच लावतात का?