सौरभ यांनी पुस्तक पूर्ण न वाचताच केवळ प्रास्ताविक वाचून आपले मत व्यक्त केलेले दिसते. कारण श्री रामकृष्णाव्यतिरिक्त जवळ जवळ ५० गुरूंविषयी पुस्तकात आलेल्या प्रकरणांचा त्यानी उल्लेखही केलेला नाही. पुस्तक केवळ लिखित माहिती (आणि तीही केवळ पाश्चात्य लेखकानी लिहिलेली) वर आधारित आहे. त्यापैकी कोणीही प्रत्यक्ष या गुरूंच्या सहवासात राहिलेले नाही आणि ते शक्यही नाही कारण दलाई लामांच्या अनेक पिढ्यांचा त्यात उल्लेख आहे.अरोबिंदोंविषयीचे पुस्तकातील उल्लेख केवळ त्यांच्या राजकीय परिस्थितीवरील भाष्याचे आहेत. त्यांचे चरित्र मी वाचले आहे त्यात यापैकी कोणत्याच गोष्टींचा उल्लेख नाही. तरीही त्यांनी केलेल्या भाष्यावरून ते निखालस बोगस ठरत नाहीत. विवेकानंदांवर बदनामीकारक मजकूर लिहून लेखकाने आपले अज्ञानच प्रकट केले आहे असे वाटते.इतक्या गुरूंच्या गराड्यात एकाही मुस्लीम गुरूचे किंवा पोपचे वस्त्रहरण करण्याचे लेखकाला धाडस झालेले नाही ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे.