बरोबर आहे तुमचे. मी हे पुस्तक सगळं वाचलं नाहिये. कारण - १) सगळं वाचावस वाटलं नाही. २) जे गुरू माहित होते त्यांच्याविषयीच वाचले. उदा. विवेकानंद, परमहंस, ओशो, दलाई लामा, झेन बुद्धिझम... त्यात सुद्धा परमहंसांवरचे आरोप जास्त गंभीर वाटले म्हणून त्यांच्यावरच लिहिले. आपण म्हणता त्याप्रमाणे हे पुस्तक फार गांभिर्याने घेतले पाहिजे अस मलाही वाटत नाही. पण असे वारंवार का घडते? बाहेरच्यांनी आपल्या संस्कृती/इतिहासाविषयी चुकीचे(?) निष्कर्ष काढावे आणि आपण त्यांना काय माहित म्हणून दुर्लक्ष करावे. आपण ज्या भावनांनी आपल्या ऐतिहसिक व्यक्तिंकडे बघतो त्याच भावनांनी इतरांना बघणे शक्य नाही, पण चूक/बरोबर किंवा हिऱोईझम च्या संकल्पना साधारण जगभर सारख्याच असतात. ह्या पार्श्वभूमीवर इतरांनी भारतीय ऐतिहासिक गोष्टिंबद्दल विचित्र लिखाण करणे आपल्याला काय सांगून जाते?