गोल्डीने देवानंदमधले गुण ओळखले आणि त्याच्यासाठी अनुरुप अशा भूमिका लिहिल्या. गोल्डीच्या दिग्दर्शनाखालीच देवानंद ताब्यात राहिला, आणि म्हणूनच गोल्डी -देव या जोडीने काही फार मनोरंजक, फार वेगळे चित्रपट दिले. आर. के. नारायणच्या कथेवर गोल्डीने 'गाईड' केला, ए. जे. क्रॉनिनच्या 'सिटाडेल' वर 'तेरे मेरे सपने' केला, बरीच उधार उसनवारी करून 'ज्युएल थीफ' हा भन्नाट प्रकार केला. अशातलाच एक तद्दन गुन्हेगारी मसालापट म्हणजे 'जॉनी मेरा नाम'
चांगले चित्रपट मिळावे म्हणून देव 'भावा'चा भुकेला असेल का? (लेखाला हे शीर्षक कसे वाटते? )