१) मराठीत श्री निसर्गदत्त महाराजांचे 'सुखसंवाद' म्हणून पुस्तक प्रसिद्ध आहे. ते कोणत्याही साधारण मोठ्या मराठी पुस्तकाच्या दुकानात मिळेल. साधकांच्या प्रश्नांना समोरासमोर दिलेली उत्तरे असे त्याचे स्वरूप आहे.

२) शून्य कळले हे फार छान वाक्य आहे. त्याचा एक अर्थ होतो काहीही कळले नाही आणि दुसरा होतो सगळे कळले! या अर्थानीच शून्याला पूर्ण म्हंटले आहे. तुम्हाला आवडले असेल तर पुन्हापुन्हा वाचा तुम्हाला निश्चीत शून्य कळेल. नसेल आवडले तर तुमची मर्जी, शून्य जसेच्या तसे आहे!

३) हे एका अर्थानी शब्दाला जोडलेले शब्दच आहेत पण नीट बघा कुठल्या शब्दाला काय अर्थ आहे? आपण सगळे जण सूर्याला सूर्य म्हणतो, आता सूर्य हा शब्द आपण सर्वानी मान्य केलेला केवळ निर्देश आहे. त्यामुळे अध्यात्मात शब्दानी शब्दांचे निराकारण करणे आणि सगळे शब्द संपल्यावर उरलेल्या शांततेत बुडून जाणे हे खरे प्रयोजन आहे.                             संजय