मात्र त्यावेळी राहून राहून एकच विचार डोक्यात येत होता. मालतपासणी प्रकरणात मालकाची कीव येऊन किंवा मोह पडल्यामुळे (सापळ्याबद्दल अनभिज्ञ असलेला) मी खोटं प्रमाणपत्र द्यायला कबूल झालो असतो नि देऊ केलेली आगाऊ अर्धी रक्कम घेतली असती तर काय झालं असतं?
किंवा वीसच्या शंभर नोटांऐवजी हजार नोटा असत्या तर काय झाले असते?
हा तुमच्या प्रामाणिकपणावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न नाही ( तो कौतुकास्पदच आहे) पण प्रत्येक माणसाची एक किंमत असते असा (आजकालचा) समज आहे. अर्थात त्यातूनही प्रलोभन कितीही मोठे असले तरी अविचल राहाणारे लोक आहेत, पण अपवादाने. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.