चर्चेत भाग घेणाऱ्यांचे आभार.
वर्तमानपत्र आवडले तर वाचावे, नाही आवडले तर वाचू नये; त्यावर इतकी चर्चा कशाला? या आशयाचा प्रश्न अपेक्षित होताच. 'सकाळ' वर मी टीका करणे हे कृतघ्नपणाचे आहे, असे (मलाही) वाटले (माझे काही लेख / पत्रे 'सकाळ' ने छापली आहेत). पण त्यापलीकडे जाऊन आजकाल 'सकाळ' वाचताना जबरदस्त कंटाळा येतो. तो मलाच की इतरांनाही याची खात्री करून घेण्यासाठी हा चर्चाप्रस्ताव होता. ( 'डोके आणि पुस्तक यांची टक्कर होऊन 'खट्ट' असा आवाज झाल्यास दोष प्रत्येक वेळी पुस्तकाचाच असतो असे नाही' इति आईनस्टाईन
)
यातून 'सकाळ' पेक्षा अमुक हे वृत्तपत्र बरे आहे, ते काही दिवस घेऊन पाहा असले एखादे उत्तर मिळते का ते बघत होतो. तोवर 'सकाळ' आहेच!