'वडाप' वगैरे शब्द वाचून रागच येतो. 'अमक्यांची म्हैस हरवली' वगैरे वर्तमानपत्रात छापायच्या बातम्या आहेत का?

सकाळ सुरवातीपासून सर्वसामान्यांच्या आवडिनिवडीच्या विचार करणारे वृत्तपत्र म्हणूनच प्रसिद्ध (आणि कदाचित म्हणूनच उच्चविद्याविभूषितांच्या चेष्टेचा विषय) होते. सुरवातीपासून (परुळेकरांच्या वेळेपासून) त्यात कुस्त्यांच्या फडाच्या बातम्या आणि शेतीच्या लागवडीवरचे लेख येत असत. साप्ताहिक स्वराज्यही तसेच (सर्वसामान्यांसाठी) होते. त्यावेळी पुण्यात केसरी घेणे महत्त्वाचे समजले जाई. आमच्या घरीही जवळ जवळ ७०-७२ पर्यंत केसरीच येत असे. पुढे केसरीचा दर्जा खालावला. त्याची पानेही कमी होऊ लागली. त्यात शुभांक आणि कँपातल्या शेवपुरीची वर्णने येऊ लागली तेव्हा आम्ही सकाळ घ्यायला लागलो.

माझे चुकत नसेल तर त्याच सुमारास पुण्याच्या सकाळच्या निर्मितीच्य यंत्रसामग्रीत बदल होऊन ती अत्याधुनिक (कदाचित प्रादेशिक भाषांमध्ये संपूर्ण भारतात सर्वात अत्याधुनिक) बनवली गेली असे वाटते आणि छपाईचा (मजकूर आणि छायाचित्रे दोन्ही) दर्जा थक्क करणारा झाला. तेव्हा खपाच्या बाबतीत संपूर्ण भारतात सकाळचा क्रमांक वरून अकरावा होता असे कुठल्यातरी इतिवृत्तात वाचलेले आठवते.

चू. भू. द्या. घ्या.