थोडंसं याबद्दल विचार करा.
शिक्षण घेत असताना एखाद दुसऱ्या मार्काने आपली स्कॉलरशीप जाते....
ज्यांना शिक्षणच घेता नाही आले त्यांचं काय ????
आपण खूप इमाने इतबारे नोकरी करतो.... पण प्रमोशन, ऑनसाईट अश्या सगळ्या संध्या आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना मिळतात....
नोकरी मिळाली, त्यात कटकट नाही हे काय कमी आहे का ? इच्छा नसताना काही गोष्टी (मार्क्स वाढवणे, पैसे खाणे, इ. ) तर करावं लागत नाही ना ?
नेहमी मनोभावे देवाची पूजा करतो... व्रत-वैकल्ये करतो... तरी रिसेशन मध्ये नोकरी जाण्याचा अनुभवही देव आपल्याला देतो....
म्हणजे देवाची पुजा करता कशाला ? काहीतरी मिळावं म्हणून. मग हा तर सौदा झाला. आणि देवावर विश्वास ठेवा आणि आपले काम करा.
पैसे साठवून आपण शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावायचा प्रयत्न करतो.... तिथेही नुकसानच वाट्याला येते....
कशाला हवाय शेअरचा सोस ? मिळत आहेत ना पैसे झालं तर मग.
नवीन घर घेऊन काही सोयी करून घ्यायच्या तरी, रंगाऱ्यापासून प्लंबरपर्यंत सगळेच आपल्याला ह्या न त्या मार्गाने फसवतात...
तुम्हाला घर तर आहे राहायला....
कधीही आपण कुणाच्या सुखावर जळत नाही... की कुणाचे वाईट व्हावे अशी इच्छा करत नाही.... तरी हे सगळे आपल्याच वाट्याला का येते???
कसले भोग आलेत ? जे सुखी वाटतात ते सुखी नाहीत हे त्यांना वाटते. शारीरिक व्याधी नसेल आणि सगळ्या उपलब्ध गोष्टींचा उपभोग घेता येत असेल तर सुख आहे नाहीतर कोट्यधीश असून साधं जेवण घ्यावं लागत असेल आणि १०० पथ्य असतील तर कसलं आलंय सुख ?
जरा तुमच्यापेक्षा गरीब व दुःखी लोकांकडे बघा मग कळेल की तुम्ही किती सुखी आहात ते.
आपलं सरळ असणं चूक आहे की सध्या कलियुगात देवच दुर्जनांचा आहे????
सरळ असणं चूक असूच शकत नाही यावर तुमचा विश्वास डळमळीत होवू देऊ नका. बी पॉझिटिव्ह.......