लेखी भाषा आणि बोली भाषा यात फरक असतो. त्यामुळे एखाद्या शब्दाचा उच्चार बदलत बदलत वेगळाच शब्द बनतो. त्याला अपभ्रंश म्हणतात. उदा. 'महाराष्ट्रा'त रहाणारे ते  'महाराष्ट्रीय' पण हा शब्द जरा बोलायला कठीण आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर आधी 'मरहट्टी' असे झाले(आठवा शिवाजी महाराजांचा काळ. ) नंतर त्याचे 'मरट्टी' झाले आणि नंतर त्याचा सोपा उच्चार 'मराठी' असा झाला. आजही काही लोक 'अलार्म' याला 'अलाराम' असे सर्रास बोलतात. जर चुकीचे बोलले गेले आणि ते वेळीच सुधारले नाही गेले तर अपभ्रंश होतात.