नमनाला घडाभर तेल

हा वाक्प्रचार देवळांमध्ये होणाऱ्या हरदासांच्या कीर्तनावरून आला.  पूर्वीच्याकाळी संध्याकाळी देवळांत कथा-कीर्तने असत.  ती समयांच्या प्रकाशात होत असत.  जसजसा वेळ जाईल तसे तसे समयांतले तेल संपून जाई.  मग त्यात तेल घालून तो प्रकाशस्रोत कायम राखला जाई.

कथा चालू होण्याअधी देवाचे नमन, गुणगान, भजन करून मग त्यानंतर कथा (सत्यवान सावित्री, लंकादहन, कंसदमन वगैरे वगैरे) सुरू होत असे.  शेवटी त्या कथेतून सार, तात्पर्य वा तत्वज्ञान मांडून कथा पूर्ण होई. 

यावरून नमनाला घडाभर तेल म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वेळ विषयाच्या तोंडओळखीमध्ये घालवणे यासाठी हा वाक्प्रचार रूढ झाला.

तसेच एक दुसरा वाक्प्रचार म्हणजे "हरदासाची कथा मूळपदावर"

टीप  -खरा शब्द हरिदास असला तरी हरदास हा जास्त प्रचलित आहे.

कलोअ,
सुभाष