लेख खूप आवडला. शैलेन्द्रची मातृभाषा हिंदी असल्यामुळे असेल, त्यांची हिंदी गाणी बोलीभाषेच्या नैसर्गिक लेहज्याकडे अधिक झुकणारी, मौखिक वाटायची असे माझे मत आहे. त्यामानाने साहिर प्रभृति उर्दू गीतकारांनी जेव्हा चित्रपटाच्या गरजेनुसार हिंदीत (हिंदुस्तानीत वा उर्दूत नाही) गाणी लिहिली तेव्हा त्यांची भाषा अधिक लेखी, साहित्यिक असायची. ती गाणी मग गाण्यांपेक्षा कविता भासायची.