सौरभ यांच्या सूचनेला अनुमोदन,
शिवाजी राजे किंवा महाराज असे तरी म्हणा. केवळ त्या माणसामुळे आज आपण मराठीपण आणि हिंदू ओळख सांगू शकतोय.
शिवाजी महाराजांच्या काळातच वजीर, तख्त, असे शब्द रूढ होते. राज्याभिषेक झालेला राजा स्वतःचा शक सुरू करतो आणि नवी प्रशासन व्यवस्थाही. त्यामुळे महाराजांनी राज्य व्यवहार कोषाचे काम रघुनाथ पंडितांना सांगून करवून घेतले. वजीरच्या जागी प्रधान, दिवाणच्या जागी सचिव असे संस्कृत शब्द उपयोजण्यास सांगितले. सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी.
पण मला एक गोष्ट समजली नाही. हा प्रश्न विचारताना डांबिस बोका म्हणतात, ' शिवाजीला तसे हवे होते म्हणून, की रघुनाथ पंडितांना ते प्रिय होते म्हणून? ' मला या विचारण्यात नम्रता जाणवत नाही किंवा रोख समजला नाही. जे महाराजांना करवूनच घ्यायचे होते ते त्यांनी घेतले. रघुनाथ पंडितांनी ते चोख पार पाडले. समजा रघुनाथ पंडितांना प्रिय शब्द घातले असतील तरी हा कोष महाराजांनी अवलोकन केला असणारच. त्या काळात महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा परस्परांवर अविचल विश्वास होता. मोरोपंत पिंगळ्यांना भोरप्या डोंगरावर किल्ला (प्रतापगड) बांधायची आज्ञा केली, तसेच हिरूजी इंदुलकरांना रायगड राजधानी म्हणून सजवायला सांगितला पण एकदा काम सांगितल्यावर त्यात ढवळाढवळ केली नाही. कारण माणसेच तशी निवडली होती. आणि त्यांना कामाचे स्वातंत्र्य होते. रघुनाथ पंडितांनीही स्वतःच्या मनचे शब्द घातले नाहीत. त्यांनी चाणक्याच्या अर्थशास्त्र आणि इतर सर्व संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला आणि प्रशासनातील फारसी शब्दांच्या जागी जुने प्रचलित शब्द उपयोजिले.
असो. भाषा वापरताना काळजी घ्या, एवढेच सुचवेन. रागाऊ नये.