अशा एकेरी उल्लेखास विरोध हा अगदी अलीकडचा असून तो बिनबुडाचा आहे, आणि 'मराठी अस्मिते'च्या नावाखाली काही राजकारण्यांनी राजकीय स्वार्थाकरिता ठोकशाहीच्या आधारावर लादलेला एक नवीन निर्बंध यापलीकडे त्याला काहीही आधार नाही. - ह्या आपल्या वाक्यामागचा इतिहास मला तरी माहित नाही.
मी विसरुनच गेलेलो की मराठीमध्ये आपण आदब बिदब काही वापरत नाही. काही वर्षांपूर्वी टिव्हीवर शाहू महाराजांची एक मालिका लागायची. त्यामध्ये एका दृष्यात शाहू महाराज त्यांच्या राज्यातील एका वयस्कर बाईशी बोलत असतात. - "काय गं म्हातारडे, तब्येत कशी हाय तुझी? ".... हे माझ्या लक्षात राहिलं कारण तेव्हा सुद्धा मला ते विचित्र वाटलं होतं.
पण मराठी माणसानी कुणाचाही उल्लेख सर्रास एकेरी करायला काहीच हरकत नाही
(मनमोहन सिंग आला, बाळासाहेब ठाकरे म्हणाला.... वगैरे... )