धन्यवाद,
आपण जे मंत्र केवळ उपचार म्हणून उच्चारतो त्यामागे एवढा विचार आहे हे माहिती नव्हते. या विश्वाच्या आवाक्याचा अंदाजही नसताना आपल्या समाजधुरिणांनि समस्त पृथ्वीवरील मानवाच्या एकात्मतेची गायलेले हे गान काळाच्या हजारो वर्षे पुढे आहे!
राष्ट्राच्या सीमांपलिकडे असलेली मानवता, आणि वैश्विक खेड्याचा विचार आपल्याकडे फार पूर्वी पासून केलेला दिसतो.
असा उदात्त विचार मांडणाऱ्यांना वंदन, आणि यशवंतराव, तुम्हाला धन्यवाद!
मन्दार.