करणे मी विसरुनच गेलेलो की मराठीमध्ये आपण आदब बिदब काही वापरत नाही. पण मराठी माणसानी कुणाचाही उल्लेख सर्रास एकेरी करायला काहीच हरकत नाही
(मनमोहन सिंग आला, बाळासाहेब ठाकरे म्हणाला.... वगैरे... ) ज्याला तुम्ही आदबबिदब म्हणतां आहांत त्याला मराठीत हांजीहांजी करणे म्हणतात. नावाआधी मा. लावणे आणि मागून जी जोडणे ही मराठी संस्कृती नाही. (शिवाजी, तानाजी, येसाजी, बाजी ह्यांतला जी त्यांच्या नावाचा भाग असल्यासारखा आहे, तो 'जी' आदरार्थी नाही! कित्येकदा 'बाई' हादेखील नावाचा भाग असतो. त्यामुळे जिजाबाई, सकवारबाई, सईबाई, पुतळाबाई या 'बाई' असल्या तरी एकवचनी. पण लक्ष्मीबाई टिळक अनेकवचनी. )
बाळ गंगाधर टिळक, बाळ गाडगीळ, बाळ माटे, बाळ कोल्हटकर, बाळ सामंत, बाळा नांदगांवकर वगैरे मंडळी बाळ असली तरी अनेकवचनी. तसेच बाळ ठाकरे. त्यांना त्यांच्या अपरोक्षही बाळासाहेब म्हणणे, म्हणजे हांजीहांजी. नुकतीच मिसरूड फुटलेल्या राज ठाकरेला मा. राजसाहेव ठाकरेजी म्हणजे म्हणजे स्वतःचे मराठी रीतिरिवाज, भाषा आणि संस्कृतीचे घोर अज्ञान पाजळणे आहे.
काही वर्षांपूर्वी टिव्हीवर शाहू महाराजांची एक मालिका लागायची. त्यामध्ये एका दृष्यात शाहू महाराज त्यांच्या राज्यातील एका वयस्कर बाईशी बोलत असतात. - "काय गं म्हातारडे, तब्येत कशी हाय तुझी? ".... हे माझ्या लक्षात राहिलं कारण तेव्हा सुद्धा मला ते विचित्र वाटलं होतं. याला कारण आपले मराठी ग्रामीण संस्कृतीबद्दलचे अज्ञान. खेड्यात बाप कितीही तरुण असला तरी त्याला म्हातारा म्हणतात आणि आईला म्हातारी. शहरी माणसाला हे खटकते. शाहू महाराज एखादीला म्हातारडे म्हणाले असतील तर त्यांना त्या बाईबद्दलचा जिव्हाळा दाखवायचा असेल, कुणी सांगावे?