बंगाली माणसे रोबिंद्रनाथांना करत असतील पण सिराजउद्दौलाला अहोजाहो करतात?
नक्की खात्री नाही, पण 'शिराजौद्दौला कोरे, शिराजउद्दौला बोललो' वगैरे कानाला बरोबर वाटत नाही, 'शिराजउद्दौला कोरेन, शिराजउद्दौला बोललेन' ठीक वाटते. बंगालीतज्ज्ञ याबद्दल खुलासा करू शकतील काय?
वेगवेगळ्या भाषांच्या वेगवेगळ्या परंपरा असू शकतात, परंतु केवळ इतर भाषांच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाषेतल्या परंपरा वेगळ्या दिसतात म्हणून त्या बदलणे कितपत सयुक्तिक आहे? बंगाल्यांनी त्यांची परंपरा पाळावी, आपण आपली. आपल्या परंपरेत शिवाजीचा एकेरी उल्लेख अनादरयुक्त नाही.
तसेच बघितले, तर शिवाजीराजे जिजाबाईंना "माँसाहेब" म्हणत, म्हणून आपणही आपल्या आईला "माँसाहेब" म्हणतो काय? मी माझ्या आईस "माँसाहेब" म्हटले, तर मी तिची खिल्ली उडवत आहे असा तिचा गैरसमज होऊन ती माझ्यावर भडकण्याचीच शक्यता अधिक वाटते.