विषय भलतीकडेच जातो आहे, खरतर लिहिणार नव्हतो पण काय करणार  
आदब म्हणजे फक्त हांजीहांजी हे मलातरी अजिबात पटण्यासारखं नाही. खरं म्हणजे, खाली मदन देशपांडे यांचा प्रतिसाद मूळ वादावर पडदा टाकतो. कि, ज्यांच्याविषयी आत्मियता/प्रेम वाटते त्यांचा उल्लेख आपण एकेरी करतो. त्यामुळे शिवाजीचा उल्लेख एकेरी बरोबर आहे, पण सगळ्याच ऐतिहासिक/पौराणिक व्यक्तिंचा उल्लेख एकेरी करायचा संकेत वगैरे विधानं हास्यास्पद आहेत. शहाजीराजांचा उल्लेख कधीच एकेरी होत नाही. (अपवाद असतील, जसेकी, एखाद्या पोवाड्यामधे, मर्दमराठा शहाजीराजा भोसला.. वगैरे असू शकेल... )

असो, मूळ विषयामध्ये "शिवाजीला", हे मला वाचताक्षणी खटकलं म्हणून मी लिहिलं. का ते सांगतो. जरी शिवाजीचा उल्लेख आपण एकेरी करत असलो तरी दरवेळेस तो बरोबर वाटत नाही. त्याचे कारण शिवाजीला तसे हवे होते म्हणून, की रघुनाथ पंडितांना ते प्रिय होते म्हणून? - ह्या वाक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या निर्णयाबद्दल आपण बोलत आहोत. आणि त्यांच्या निर्णयाबद्दल योग्य तो आदर बाळगला पाहिजे. ह्या ठिकाणी त्यांचा उल्लेख एकेरी झाल्याने शिवाजी महाराजांची मतं/ त्यांचा निर्णय हा आपण कमी लेखतो आहोत असं भासतं. (जरी लिहिणाऱ्याच्या मनात तसं नसलं तरी...)