परकीय विद्वान एकेरी, आपले मात्र बहुवचनी, हे तंतोतंत पटले. आपला तो बाळ, दुसऱ्याचा बाळ्या. आपले ते चिरंजीव, दुसऱ्याचे कारटे.  ही मराठी संस्कृती आहे.  ती हळूहळू आणि आपोआप बदलली तर बदलेल, जबरदस्तीने बदलवता येणार नाही.

वरती  सौरभ२००९ यांचे एक विधान आहे--'ह्या आपल्या वाक्यामागचा इतिहास मला तरी माहित नाही.'--ऐतिहासिक व्यक्तींचा  ओढूनताणून आदरार्थी उल्लेख करणे हा इतिहास नाही, तर वर्तमान आहे.  त्यामुळे त्यात मुद्दाम माहीत करून घेण्यासारखे काही नाही.--अद्वैतुल्लाखान