मला वाटते की त्या काळामधे सर्वत्र फारसी भाषेचा प्रसार झाला होता कारण एकतर मोंगल, अदिलशाह वगैरे राज्य करत होते. तसेच एतद्देशीय लोक आपली भाषा, धर्म त्यांच्या पायाशी वाहून त्यांची चाकरी करत होते. त्याकाळात हिंदू राजा ही संकल्पना प्रथम शिवाजी राजांनी परत लोकांसमोर आणली. तोपर्यंत हिंदू कायम गुलाम आहेत आणि त्यांना राज्य करता येत नाही असे काहिसे वातावरण झाले होते. शिवाजी राजे हे काळाच्या पुढे होते. नुसते राज्य करायचे नाही तर आपली भाषा आपला राज्य भाषा व्यवहार कोश तयार करायचा की जेणे करून जनमानसात निर्माण झालेली मरगळ किंवा त्यांचा स्वाभिमान जाग्रुत (हा शब्द कसा लिहायचा ते सांगावे) करायचा. आपणही राज्य करू शकतो आणि आपल्यामध्येही ती ताकत आहे हे ही ठसवण्याचा हा प्रयत्न असावा. म्हणूनच राजा कसा असावा याचे समर्थांनी योग्य उत्तर दिले आहे. आजही जगभरातील किंवा विवीध देशातील सैन्यामध्ये राजांच्या प्रतापगडाच्या युद्धाचा आभ्यास केला जातो यातच महाराजांच्या द्रष्टेपणाची महती कळून येते.

ता. क.    जर का आत्ताच्या राज्यकर्त्यांनी महाराजांचे नाव घेवून राजकारण करण्याऐवजी त्यांच्या कामाच्या १० टक्के जरी काम अंगी बाणवले तरी भरपूर.