वरील लेखातील हिंदूंच्या मूर्तिपूजेविषयीचे विचार तसेच "हिंदू मनुष्य चुकीच्या सत्याकडे प्रवास करीत नाही तर कमी सत्याकडून अधिक सत्याकडे प्रवास करतो" इत्यादी कल्पना स्वामी विवेकानंदांनी 'हिंदुधर्म' या विषयावर १९ सप्टेंबर १८९३ ला शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत वाचलेल्या निबंधात मांडल्या आहेत. (संदर्भ : स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग १, पृष्ठ ५). कदाचित वरील लेखातील काही भाग मूळ इंग्रजी निबंधातून भाषांतर करून घेतला असेल.