या काळात केलेले अळुपिष्टीकरण लादले तरी खपणार नाही, त्यामुळे उगीच चिंता कशाला करायची? जेव्हा मराठी लिपीत ऍ आणि ऑ लिहायची सोय नव्हती(दॅट-द्याट), संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांतील न चा ण(पानीय-पाणी; नवनीत-लोणी, बटन-बटण), ल चा ळ(बाल-बाळ), इंग्रजीतील स्ट चा ष्ट(पोस्ट-पोष्ट), दंत्योष्ट्य व़ चा व्ह(विक्टरि-व्हिक्टरी), हाउ चा हौ(हाउस्‌=हौस) होत असत, त्या काळात अळुपिष्टीकरण झाले; आता का होईल? पण हे मराठीपुरते झाले. अजूनही मराठी सोडून अन्य भारतीय लिप्यांत ऍ आणि ऑ नाहीत, ते बँक चे बैंक, स्‍नॅक्सचे स्‍नेक्स आणि हॉलचे होऽल करतच राहणार, आपण कुठवर पुरे पडणार?. (माझ्या माहितीप्रमाणे फक्त श्रीलंकन लिपीत ऍ, ऑ आहेत.)
तेव्हा आता समंजस मराठीभाषक करतील तसे इंग्रजी शब्दांचे मराठीकरण होईल तसे होऊ द्यावे (पलीस्-पोलीस, गटर-गटार, कॉलिज्-कॉलेज). उच्चारानुसार लिखाण आणि लिहिल्याप्रमाणे उच्चारण हे कोणत्याही भाषेला अजून जमलेले नाही. (संस्कृतचा अपवाद; तिथे अ, इ, उ, ऋ चे प्रत्येकी १८ उच्चार आणि बाकीच्या स्वरांचे १२।१२ उच्चार दाखवायला लिपीत चिन्हे होती). मराठीला का जमावे?