नऊच्या पाढ्यातील प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज नऊ येते.


१८ -> १+८=९
२७ -> २+७=९
३६ -> ३+६=९
४५ -> ४+५=९
५४ -> ५+४=९
६३ -> ६+३=९
७२ -> ७+२=९
८१ -> ८+१=९
९०

तसेच कोणत्याही संख्येत नऊ मिळवले असता त्या नवीन संख्येतील सर्व अंकांची बेरीज त्या मूळ संख्येतील अंकांच्या बेरजेइतकीच येते.

उदा०
३+९=१२ -> १+२=३

उदा०
८७६३२  -> ८+७+६+३+२= २६  -> २+६=८
८७६३२+९=८७६४१  -> ८+७+६+४+१= २६  -> २+६=८

हे असे का बरे? आपण दशमान पद्धत वापरतो म्हणून का?