बहिणाबाईंच्या काव्यातील अत्यंत वेचक ओळी आपण उद्धृत केल्या आहेत. अक्षरओळखही नसलेल्या बहिणाबाईंनी
अरे पांडूरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपा आड येत
सावकाराचं रे सोंग
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
मानसा मानसा कधी व्हशील मानूस
अशा ओळी लिहिल्या हे पाहून थक्क व्हायला होतं.