अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कंबलम्
शङखपालं धृतराष्ट्रंच तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानी नागानांच महात्मना
सायंकाले पठेनित्यं प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत

अर्थ:
अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, आणि कालिया हे नऊ महान/महत्त्वाचे नाग आहेत. यांचे नित्यनेमाने संध्याकाळी आणि विशेषतः प्रातःकाळी स्मरण केले असता (पठण करणाऱ्या व्यक्तीस) विषाचे भय नसते आणि (पठण करणारी व्यक्ती) सर्वत्र विजयी होते.

ता. क. - शुद्धलेखन, पाठभेद, अन्वय अथवा अर्थ यांतील दुरूस्तींचे स्वागत आहे.