सोलापूरात जवळ जवळ प्रत्येक सरकारी, निम-सरकारी, खाजगी इमारतीमध्ये जिना चढताना कोपऱ्यात देवी-देवतांचे चित्र लावले आहेत. लोकांनी थुंकू नये म्हणून हा जालिम उपाय कोणीतरी शोधून काढला असावा. पण प्रश्न असा आहे कि समजा कोणी अहिंदू व्यक्तिने थुंकले तर लोकांना आयताच भांडायला (धार्मिक तेढ)  नवा निषय नाही का मिळणार? आपण भारतीय लोक नेहमी म्हणतो कि देव हा सगळीकडे असतो. तेव्हा आपण स्वतः थुंकण्या आधी हा विचार करायला हवा.