माझ्यामते "सभ्य " या लोकांच्या व्याख्या खालिलप्रमाणे आहेत . आणि जी मंडळी या व्याख्येत फिट्ट बसतात त्यांनी राजकारणात येऊ नये.

१) आपणाला आजुबाजुच्या परिस्थितीशी काही देणेघेणे नाही.

२) कोणीही निवडून आले तरी आपल्या आयुश्यात काही फरक पडणार आहे का ?

३) हे सगळे मीच का करावे दुसरा कोणी का नको.

४) ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान.

५) एक दिवस वाघाचे आयुष्य जगण्यापेक्शा अनेक वर्षे शेळीचे आयुष्य जगलेले बरे कारण तेवढेच जास्त दिवस गवत खाता येते.

६)मी सर्व नियम ईमानदारीत पाळणार. मी धोका पत्करणार नाही.