तसे शनीच्या पोथीतही त्याचे महत्त्व वाचले होते. त्याच्या नुसत्या दृष्टीने जर रावणाचे साम्राज्य धुळीला मिळते तर इतरांची काय कथा.
मर्यादापुरुषोत्तमाला आजवर आपण दुर्जननाशक योद्धा समजत होतो, ते व्यर्थच म्हणायचे. रावणाचा पाडाव होण्यामागे मूळ कारण शनीची दृष्टी हे आहे, तर राम फक्त निमित्तमात्र की काय? तसे असेल तर रामायणातील या आदर्श आर्याचे निव्वळ एक भुसभुशीत बुजगावणे होऊन जाते. मूळ लेखकाला ते मान्य आहे काय?
एखाद्या व्यक्तीला व तिच्या नातेवाईकांना विविध प्रकारचे आजार होणे याचा थेट संबंध साडेसाती, शनी वगैरेशी कसा लावता येईल? रमेशसारखीच कहाणी असलेली अनेक उदाहरणे शोधून काढता येतील. त्यांच्या राशींत साडेसाती नव्हती असेही सिद्ध करता येईल. मग या लोकांना हे आजार का झाले? शनीची वक्रदृष्टी भगिंदरापासून कॅन्सर देऊ शकत असेल तर मॉडर्न मेडिसीनला तिलांजली द्यावी हे उत्तम.
आता त्याचा विपत्तीचा काळ संपला होता. निदान आता तरी कांही नवीन दुखणे निर्माण झाले नव्हते. रमेश नास्तिक असूनही श्री स्वामी समर्थ यांचा भक्त झाला होता. त्यांच्यांच कृपेने तो आता उभा आहे.
हे आणखी एक नवीन. स्वामी समर्थांची भक्ती हे साडेसातीवरचे अँण्टीडोट आहे काय?
आधीच आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या नावाने आनंद आहे. भाबड्या मनांना ऍनेस्थिशिया देणारे असले लेख लिहून त्यात भर घालू नये.