- मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होऊन रिक्शा आणि टॅक्सीवाले मराठी बोलू शकतील/लागतील असे तुम्हाला वाटते का?
नाही. मुळात गिऱ्हाईकांनी मराठीत बोललेच नाही तर रिक्षावाल्यांना मराठी बोलायची संधी कशी मिळणार.
- मुळात
मराठीतून शिक्षण झालेल्या व्यक्तींच्या (रेल्वे, बस, विमान इ. ) सार्वजनिक
ठिकाणी इतरांशी मराठी बोलण्याचा तुम्हाला काय अनुभव आहे?
शक्यतो मराठी बोलण्याचे टाळतात. एक गंमत ऐका. काल प्रभात थिएटरला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेडिओ मिरचीने प्रभातचे कर्तेधर्ते श्री. लिमये (?) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी. रेडिओ छबकडी अदितीने विचारलेल्या मराठीतील प्रश्नांना श्री. लिमये 'इट्स माय प्लेजर. आय नो इट वाज टफ टाईम. थ्यांक्यू सो मच' वगैरे ६८ टक्के इंग्लिशमधून उत्तरे का देत होते हे समजले नाही.
- मराठी साहित्य इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देण्यासाठी जे श्रम/संसाधने लागतील त्याचा खर्च कोण करील असे तुम्हाला वाटते?
कोणीही नाही. उगाच आश्वासनांची संख्या वाढवण्यासाठी हे टाकले असावे असे वाटते.
- वरील मुद्यांत मराठी अस्मिता आणि भाषेचे संरक्षण आणि एकता ह्या दोहोंची सांगड कशी घातलेली आहे असे तुम्हाला वाटते?
मते मिळवण्यासाठी अशी शाब्दिक कसरत करावी लागते. समजून घ्या.
- अजेंडाला शासकीय शब्दकोशात 'कार्यसूची' हा शब्द सांगितलेला असताना तिला 'अजेंडा' असे म्हणण्याचे कारण काय असावे बरे?
कदाचित मराठी शब्द आठवला नसावा किंवा माहीत नसावा.
- महाराष्ट्रविषयक आणि मराठीविषयक मुद्दे अंतर्भूत असणाऱ्या ह्या पुस्तिकेचे नाव व्हीजन महाराष्ट्र असे का ठेवले असावे?
सेम ऍज अबोव!!
कर्नाटकातही भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातही त्यांचेच सरकार आले तर बेळगाव प्रश्नाबाबत भाजपचे काय धोरण असेल? की या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली आहे?