समजुतींवर आधारित लेख आहे हे मान्य! पण निवास पाटलांच्या पुस्तकातील शास्त्रीय माहितीप्रमाणे ज्या ग्रह-गोलांभोवती वायू व मूलद्रव्यांनी युक्त अशी कडी असतात त्यातून वातावरणात काही गोष्टींचा मारा चालू असतो. शनीच्या सगळ्यात जवळ गुरू आहे म्हणून कुणी गुरूवर जाऊन बघू शकत नाही. पण मानवी इंद्रियांच्या क्षमतांपलीकडे विश्वाचा कारखाना आहे हे सिद्ध झालेले आहे. २५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकांमधूनही दररोज काही नवीनच कळत आहे. अजूनही आपल्याच आकाशगंगेतील सूर्याहून बऱ्याच मोठ्या असलेल्या सुमारे सहाशे अब्ज ताऱ्यांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही. तेव्हा आपल्याच सूर्यमालेतील एक ग्रह आपल्यावर काही परिणाम करू शकतो की नाही यावर मतप्रदर्शन व्हायला हरकत नाही. श्रद्धा हा अशा लेखांचा पाया नसावा असा सूर प्रतिसादकांचा आहे हे उघड व पटण्यासारखेच आहे. पण शनी काहीच करू शकत नसेल असे छातीठोकपणे म्हणण्याइतपत आपण अजून पोचलेलो नाहीत. या गोष्टीकडे स्वामी समर्थांवरील श्रद्धा या कोनातून बघावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण शनी निष्क्रीयच असेल असे का वाटते? चंद्रामुळे ओहोटी, भरती येते हेही काही अगदी सुरुवातीच्या मानवजातीला ज्ञात असेल असे थोडेच आहे?
-सविनय
बेफिकीर!